सांगोला तालुका

पौष्टिक अन्नघटक व औषधी गुणधर्म आसलेल्या रानभाज्यांचा आहारातील वापर वाढवावा-आमदार अॕड.शहाजीबापू पाटील

दिनांक २३ आॕगस्ट २०२२ रोजी कृषि विभागाच्या आत्मा आंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव , आॕगस्ट क्रांती दिन , जागतीक आदिवासी दिनानिमीत्त नविन भाजी मंडई , सांगोला येथे रानभाची महोत्सव आयोजित करण्यात आला.

 

महोत्सवाचे उद्घाटन मा.आमदार अॕड. शहाजीबापू पाटील ,विधानसभा सदस्य सांगोला व माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटिल यांचे हस्ते करण्यात आले. महोत्सवामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या तसेच विविध प्रकारचे सेंद्रिय उत्पादने, प्रक्रियायुक्त पदार्भ प्रदर्शनासाठी व विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. विविध रानभाज्यांचे ओळख, पौष्टिक अन्नघटक, औषधी गुणधर्म , रानभाज्यांची पाककृती याविषयी माहिती महोत्सवामध्ये देण्यात आली. शेतीमध्ये व अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये चांगले काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार अॕड शहाजीबापू पाटिल यांनी आपल्या भागामध्ये येणाऱ्या रानभाज्या ओळखुन , त्याचे आहारातील व आरोग्यविषयक महत्व याबाबत गावोगावी मोठ्याप्रमाणावर जनजागृती करावी. आहारामध्ये रानभाज्यांचा वापर वाढवावा. रानभाज्याविक्रीची व्यवस्था निर्माण करावे असे आवाहन केले.

 

यावेळी बोलताना माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटिल म्हणाले, उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खते व किटकनाशकांचा वापर होत असल्याने रानभाज्या नष्ट होत चालल्या आहेत.रानभाज्या उपलब्ध होण्यासाठी कृषि विभागाने प्रयत्न करावेत असे त्यांनी सांगितले. प्रास्तविकामध्ये तालुका कृषि अधिकारी शावाजी शिंदे यांनी रानभाज्यांचे ओळख, महत्व , सेंद्रिय शेती , पौष्टिक तृणधान्य , प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेबाबत माहिती दिली. यावेळी वसंतराव नाईक कृषि गौरव पुरस्कार मिळालेबद्दल श्री बजरंग साळुंखे यांचा विषेश सत्कार करण्यात आला.शेती आणि प्रक्रिया ऊद्योगामध्ये विशेष कार्य करणारे स्वाती गायकवाड कडलास, स्वाती केसकर महुद , सुरेश पवार, ब्रम्हदेव बाबर यांचाही सत्कार करण्यात आला.

 

कार्यक्रमास तहसिलदार संजय खडतरे, मुख्याधिकारी सुधिर गवळी, माजी नगरसेवक सतिष सावंत , जैविकाॕन ऊद्योगसमुहाचे अजय इंगोले , बजरंग साळुंखे , मंडळ कृषि अधिकारी अमोल अभंग, प्रविण झांबरे , भाग्यश्री पाटिल , कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी , शेतकरी , महिला बचत गटाचे सदस्य , शेतकरी मित्र, शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री उत्कर्ष चंदनशिवे यांनी तर आभार कृषि पर्यवेक्षक श्रीधर शेजवळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री मेघराज पोळ, श्रीकांत सोनवने , कृषि विभागाचे आधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!