अस्वस्थ नोकरदार.

या देशात जशी बेरोजगारीची गंभीर समस्या आहे,ती सरकारी व निमसरकारी तसेच खाजगी क्षेत्रात नोकरी करणार्‍यांची अवस्थाही दैना आहे.नोकरदार वर्ग समाधानी नाही,असा अनुमान समोर आला आहे.

देशातील कर्मचार्‍यांवर प्रचंड दबाव वाढत चालल्याचे जाणकार सांगतात. एका सर्वेक्षणानुसार, देशातील 86 टक्के कर्मचारी स्वत:ला पीडित आणि संघर्ष करणारे समजतात. केवळ 14 टक्के कर्मचारी समाधानी आणि समृद्ध आहेत. हा आकडा जागतिक सरासरीच्या 34 टक्क्यांपेक्षा खूपच कमी आहे. अमेरिकन अ‍ॅनालिटिक्स कंपनी गॅलपच्या ग्लोबल वर्कप्लेस रिपोर्टनुसार, भारतातील कर्मचारी खूश नाहीत. गॅलपच्या जगभरातील कर्मचार्‍यांचे मानसिक आरोग्य आणि कल्याण यावर हा रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे.

त्यात हा निष्कर्ष आहे. सर्वेक्षणात समाविष्ट केलेल्या लोकांची तीन श्रेणींमध्ये विभागणी केली गेली आहे. यात समृद्ध, संघर्षशील आणि दुःखी अशा व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, केवळ 14 टक्के भारतीय कर्मचारी स्वत:ला समृद्ध समजतात. मिळालेल्या माहितीनुसार, 86 टक्के कर्मचारी स्वत:ला त्रासलेले समजतात. त्यांनी स्वत:ला संघर्ष आणि दुःखी या श्रेणीत ठेवले आहे. ज्या लोकांनी त्यांच्या परिस्थितीला 7 किंवा त्याहून अधिक गुणांचे रेटिंग दिले, त्यांना समृद्ध श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. या सर्वांच्या आयुष्यात पुढील 5 वर्षांत सकारात्मक सुधारणा दिसत आहेत. तसेच 4 ते 7 दरम्यान रेटिंग देणार्‍यांना संघर्ष करणार्‍यांच्या कॅटेगरीत टाकण्यात आले आहे. या लोकांच्या जीवनाबद्दल अनिश्चित आणि नकारात्मक विचार आहेत.

या सर्वांना आर्थिक संकटाचाही सामना करावा लागत आहे. याशिवाय 4 आणि त्यापेक्षा कमी रेटिंग देणार्‍यांना पीडित श्रेणीत टाकण्यात आले आहे. त्यांना कामाच्या ठिकाणी त्यांचे काही भविष्य दिसत नाही. गॅलपच्या रिपोर्टनुसार, बहुतेक कर्मचारी अन्न, घर, आजारपण आणि आरोग्य विमा यांसारख्या आव्हानांशी झुंज देत आहेत. दक्षिण आशियामध्ये समृद्ध कर्मचार्‍यांची संख्या सर्वात कमी आहे. नेपाळमधील कर्मचारी भारताच्या तुलनेत अधिक आनंदी आहेत. येथे 22 टक्के कर्मचार्‍यांनी स्वत:ला सर्वोच्च श्रेणीत ठेवले आहे. संपूर्ण जगात जबाबदारीने काम करणार्‍या लोकांची सरासरी सर्वाधिक भारतीय कर्मचार्‍यांचे भविष्य सुरक्षित करण्याची खरी तर गरज आहे. अनेकांनी कामावर नकारात्मक भावना वाढवल्या आहेत. सुमारे 35 टक्के भारतीय कर्मचार्‍यांना दररोज राग येतो.

श्रीलंकेत हा आकडा 62 टक्के तर अफगाणिस्तानमध्ये 58 टक्के आहे. असे असूनही भारतीय कर्मचारी त्यांचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत. या प्रकरणात त्याची सरासरी 32 टक्के आहे. हे जागतिक सरासरीच्या 23 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. संघर्षानंतरही भारतीय कर्मचारी अजूनही कामात व्यस्त असल्याचे रिपोर्टवरून स्पष्ट झाले आहे. दक्षिण आशियात जवळपास 29 टक्के कामगारांना एकटे पाडल्याची भावना सतावते आहे. तर सुमारे 42 टक्के कामगारांना ते स्वतः दुःखी वाटत आहेत. बाहेर राहून काम करणार्‍या 25 टक्के कामगारांनी 16 टक्के ऑफिसमध्ये काम करणार्‍या कामगारांच्या तुलनेत एकाकीपणाची भावना व्यक्त केली आहे. एकाकीपणाचा परिणाम 35 वर्षांखालील तरुण कर्मचार्‍यांवर त्यांच्या जुन्या समकक्षांपेक्षा जास्त होतो, पुरुष आणि स्त्रियांमध्ये समान प्रमाणात प्रत्सेकी 20 टक्के एकटेपणाची भावना आहे. भारतातील 48 टक्के कर्मचारी मन लावून काम करीत आहेत, तर केवळ 32 टक्के लोक नामधारी काम करीत आहेत. खरं तर ही उदासीन दिनचर्या असूनही भारतीय कर्मचारी जागतिक सरासरीत 23 टक्क्यांच्या तुलनेत जास्त व्यस्त असल्याचे दाखवत आहेत.

जागतिक स्तरावर 20 टक्के कामगार स्वत:ला त्यांच्या नोकर्‍यांमध्ये असुरक्षित मानतात. कर्मचार्‍यांची प्रतिबद्धता म्हणजे कर्मचार्‍यांना त्यांच्या कार्यांबद्दल वाटणारी वचनबद्धता आणि प्रेरणा आहे. खरं तर उत्पादकता वाढवणे आणि कामाच्या ठिकाणी कर्मचार्‍यांचे समाधान करणे हे कंपनीचे काम आहे. अनेक कर्मचार्‍यांना असंतुष्टता आणि असुरक्षितता वाटत असल्याचे कारण म्हणजे कामाच्या ठिकाणी त्यांच्या गरजा पूर्ण होत नाहीत, असेही रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 57 टक्के भारतीय कर्मचारी नोकरीच्या बाजारपेठेकडे अनुकूलतेने पाहतात, जरी हे मागील वर्षाच्या तुलनेत 2 टक्क्यांनी कमी झाले आहे. हा आकडा दक्षिण आशियातील सरासरी 48 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

 

सकारात्मक दृष्टिकोन असूनही भारतातील 52 टक्के कर्मचारी सक्रियपणे नवीन नोकरीच्या संधी शोधत आहेत, जे प्रादेशिक सरासरीपेक्षा कमी आहे. परंतु तरीही कंपनी आणि कर्मचार्‍यांसाठी समान चिंता निर्माण करते. अशाच चिंतेवर प्रकाश टाकताना गॅलपचे जागतिक संशोधन संचालक राजेश श्रीनिवासन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “ कर्मचार्‍यांची सध्याची नोकरी सोडण्याची मनस्थिती पाहता कंपनीने त्यांच्या कर्मचार्‍यांना अधिक प्रभावीपणे गुंतवून ठेवण्याची आणि त्यांना समर्थन देण्याची गंभीर गरज अधोरेखित केली आहे. ज्या कर्मचार्‍यांना त्यांच्या नोकर्‍या आवडत नाहीत, त्यांच्यामध्ये दररोजचा ताण आणि चिंता आणि इतर सर्व नकारात्मक भावनांची पातळी उच्च असते. “कामाच्या ठिकाणी असमाधानाची भावना दूर केल्यास तणावाची पातळी कमी होऊ शकते. तसेच नकारात्मक अनुभव कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे एकूणच नोकरीतील समाधान आणि काम करण्याची इच्छा वाढू शकते,असे हे रिपोर्ट सांगते.मग हा बदल कृतीतून कसा होणार हा खरा प्रश्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button