ध्येय सातत्य ठेवून कष्ट केल्यास यश प्राप्ती-डॉ सौ वर्षाताई रणदिवे

नाझरे (प्रतिनिधी):- महिलांनी कोणतेही काम करताना डोळ्यांसमोर ध्येय ठेवून कष्ट केल्यास हमखास यश प्राप्ती मिळते असे मत भावेश्वरी मिरची कांडप मशीन उद्घाटन प्रसंगी नाझरे ता सांगोला येथे जाई फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ.सौ वर्षाताई मारुती रणदिवे यांनी व्यक्त केले. कांडप मशीनचे उद्घाटन मुंबई विक्रीकर उपायुक्त मारुती रणदिवे व डॉ सौ वर्षाताई रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी पत्रकार रविराज शेटे होते.
सदर प्रसंगी आनंदा सोनार, कविता सोनार ,अन्नपूर्णा सोनार, सुमन सोनार, संजय सोनार, बस लिंग मठपती स्वामी जाई फाउंडेशन अधिकारी सौ दिपाली स्वामी, सौ शुभांगी धोकटे , सौ अर्चना रायचूरे , भारती लोहार , सौ प्रियांका निंबाळकर, कल्पना सोनार, सखुबाई शेजाळ, समाधान वाघमारे , संजय वाघमारे, संतोष रायचुरे, सचिन धोकटे, गोपाळ चांडोले, लक्ष्मण सोनार, शिवया गुत्तेदार, नाना सरगर, संजय वलेकर , निलेश सरगर उपस्थित होते. शेवटी संजय सोनार यांनी आभार मानले.