अटलबिहारी वाजपेयी भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान – चेतनसिंह केदार-सावंत

माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयींच्या काळात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. अटलबिहारी वाजपेयी एक प्रतिभासंपन्न असं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी भारताचं नाव अनेक क्षेत्रात मोठं केलं. स्व.माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी म्हणजे भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे असे मत भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी व्यक्त केले.
भाजपचे जेष्ठ नेते माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती हा दिवस देशभर सुशासन दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. जयंती व सुशासन दिनाचे औचित्य साधून भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह (बाळासाहेब) केदार-सावंत यांच्या नेतृत्वाखाली सांगोल्यात सुशासन दिवस साजरा करण्यात आला. यावेळी स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह (बाळासाहेब) केदार-सावंत म्हणाले, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 साली मध्यप्रदेशत्या ग्वाल्हेरमध्ये झाला होता. ते तीन वेळा भारताचे पंतप्रधान झाले. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी हे संयुक्त राष्ट्र संघामध्ये हिंदीत भाषण देणारे पहिले नेते होते. जिंदादिल राजकारणी, हळूवार मनाचा कवी, सेवाभावी माणूस म्हणून अटलबिहारी वाजपेयी परिचीत होते. संयमी, शांत आणि अभ्यासू राजकारणी अन् तितकेच हळव्या मनाचे कवी अशी त्यांची ओळख होती. अटलबिहारी वाजपेयी यांचं राष्ट्रावर अतिव प्रेम होतं. शिवाय आपल्या पक्षावर त्यांची निष्ठा होती. हिंदुत्व म्हणजे अटलजी यांचा श्वास होता अशा शब्दात भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह (बाळासाहेब) केदार-सावंत यांचा जीवनपट उलगडला.
यावेळी शिवाजीराव गायकवाड, वसंत सुपेकर, लक्ष्मीकांत लिगाडे, डॉ. अनिल कांबळे, प्रवीण जानकर, संजय केदार, पोपट खरात, सुनील चव्हाण, शंकर केदार, प्रकाश गायकवाड, कुमार वलेकर, सिद्धेश्वर गाडे, दीपक केदार, रोहित सावंत, ओंकार कुलकर्णी, विनोद उबाळे, अनिकेत शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.