स्वार्थासाठी काही लोकांनी या भागाचे पाणी अडविले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सांगोला:- आपल्या स्वार्थासाठी काही लोकांनी या भागाचे पाणी अडविले. या सर्व योजना आपण सुरू करुन पूर्ण केल्या हे फक्त सरकारमुळे शक्य झाले आहे. असे सांगत मोदींच्या इंजिनाला विकासाचे डब्बे आहेत. तर विरोधकांच्या इंजिनाला डबेच असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
माढा लोकसभा मतदारसंघांचे महायुतीचा उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ उपुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची सांगोला येथे जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.व्यासपीठावर आ.शहाजी पाटील, मा.आ.प्रशांत परिचारक, मा.आ. दिपकआबा साळुंखे पाटील उपस्थित होते.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाण्याचे भगीरथ हे खा.रणजितसिंह निंबाळकर आणि शहाजीबापू पाटील हे दोघेच आहेत. या दोघांनीही पाण्याच्या सर्व अडचणी जाणू घेेऊन रात्र दिवस प्रयत्न केले म्हणून पाणी आले आहे.
यावेळी आ.शहाजीबापू पाटील म्हणाले, सांगोला तालुक्याला पाणी शिवसेना व भाजपने दिले आहे.याचे उपकार आता फेडायची वेळ आली आहे. माझ्या नादाला लागू नका.लागायच्या भानगडीत पडू नको..अजुनही मी जीभ आवळून धरली आहे असा टोलाही मोहिते पाटील यांना नाव न घेता लगाविला.
यावेळी खा.रणजित निंबाळकर म्हणाले, उभ्या दुष्काळात सांगोला तालुक्यातील नदी वाहण्याचा करिश्मा फडणवीस यांच्यामुळे झालाआहे. मागील काळात काही मंडळी संगोल्यावर जाणीव पूर्वक अन्याय करत होती.पाणी मिळविण्यासाठी इच्छा शक्ती लागते. इच्छा शक्ती मुळे पाणी आले.पवारांनी आश्वासन शिवाय काहीच दिले नाही. मोहिते पाटील यांच्या नसानसात गद्दारी भिनली आहे. सांगोला तालुका अशा लोकांना बळी पडणार नाही असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी दीपकआबा म्हणाले, 10 वर्षे जगाच्या राजकारणामध्ये पहिल्या फळीमध्ये नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले. राज्याचा परीस म्हणजे देंवेद्र फडणवीस असून 50 वर्षे अनेक स्वप्ने बघितली.येणार्या निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
जाहीर महाविकास आघाडीतील मित्र पक्षाचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन आनंदकाका घोंगडे यांनी केले.