सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

तालुक्यातील सर्वसामान्य जनतेनी देशमुख कुटुंबियांसोबत प्रामाणिक राहावे- आम.रोहितदादा पवार

सांगोला (प्रतिनिधी):- मी महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून आहे .त्याचप्रमाणे युवावर्ग, शेतकरी, कष्टकर्‍यांसाठी लढतोय म्हणून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे. सर्वसामान्य जनता सोबत आहे त्यामुळे काय कारवाई करायची ती करा मी कारवाईला घाबरणार नाही. युवकांसाठी असणारे महत्त्वपूर्ण प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. महाराष्ट्राचा शेतकरी अडचणीत असताना देखील आज कृषी मंत्री दिसून येत नाहीत ही बाब गंभीर असून सध्याच्या सरकारला कुटुंब, संघटना फोडण्यासाठी वेळ असून सर्वसामान्यांसाठी वेळ नाही. सध्याचे सरकार पुन्हा आले तर संविधान व लोकशाही जिवंत राहणार नाही.अशी भिती आम.रोहितदादा पवार यांनी व्यक्त करत तालुक्यातील सर्वसामान्य जनतेनी देशमुख कुटुंबियांसोबत प्रामाणिक राहावे असे आवाहन केले.

शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना व महाविकास आघाडी यांच्या वतीने सांगोला येथे सोमवार दि.11 मार्च रोजी भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला. या मेळाव्या प्रसंगी आमदार रोहितदादा पवार बोलत होते. व्यासपीठावर श्रीमती रतनबाई गणपतराव देशमुख, शेकाप सरचिटणीस भाई जयंत पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, राजू कोरडे, डॉ.बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख, पंढरपूरचे अभिजीतआबा पाटील, राष्ट्रवादीचे बाबुराव गायकवाड, भरत अण्णा शेळके, चिटणीस दादाशेठ बाबर, डॉ.प्रभाकर माळी, मारुतीआबा बनकर, बाळासाहेब एरंडे, सूर्यकांत घाडगे, अरविंद पाटील, नवनाथ पाटील,काँग्रेसचे अभिषेक कांबळे, तोहीद मुल्ला यांच्यासह मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार रोहितदादा पवार म्हणाले की, भाजपला कुणाचेही घेणे देणे पडले नसून फक्त स्वतःचे हित पडले आहे.येणार्‍या लोकसभा निवडणुकीत दबावतंत्र वापरण्यात येणार आहे. यासाठी आपणा सर्वांना एकजुटीने लढावयाचे आहे. सरकारकडून फक्त जाहिरातींवर खर्च करण्यात येत असून फुटून गेलेले आमदार उद्या आमदार नसणार आहेत.येणार्‍या सर्व निवडणुकामध्ये स्वाभिमानी महाराष्ट्र राज्यांमध्ये आपल्या विचाराचे सरकार आणा असेही आवाहन सुध्दा शेवटी त्यांनी केले.

शेकाप चिटणीस भाई.जयंत पाटील म्हणाले, शरदराव पवार व उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता खंबीरपणे उभी आहे देशामध्ये इंडिया आघाडी भक्कम असून आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. राजकारण करायचे असेल तर या पुढील काळात मोदी राजवट ंयेता कामा नये, लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही राजू शेट्टी आणि माढा अशा दोन जागा मागितलेल्या आहेत. सद्य परिस्थितीत इंडिया आघाडी भक्कम स्थितीत असून इंडिया आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. स्व.आबासाहेबांना खरी श्रध्दांजली देण्यासाठी माढा लोकसभा मतदार संघामध्ये त्यांच्या घरातील उमेदवार निवडून द्यावा अशी विनंती इंडिया आघाडीकडे केली आहे. आणि त्यादृष्टीकोनातून प्रयत्न सुरु आहेत. डॉ.बाबासाहेब शांत स्वभावाचे आहेत. अनिकेत माझ्या सारखा आहे. डॉ.बाबासाहेब व डॉक्टर अनिकेत ही आबासाहेबांच्या रक्तातील असून हे दोघेही वेडेवाकडे पाऊल उचलणार नाहीत याची कोणी काळजी करु नका, आणि कोणी करण्याचा प्रयत्नही करु नका अशी विनंती करत येणार्‍या निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात जास्त मताधिक्य असणारा सांगोला मतदार संघाचा विजय असेल अशी खात्री शेवटी त्यांनी देत उमेदवारी कोणतीही जाहीर केली नाही परंतु तुमचा आदर नक्की केला जाईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणाले, लालबावटा हा सर्वसामान्य आणि नाही रे वर्गाचे प्रतिक आहे. गेल्या काही दिवसपासून लाल बावट्याला हिणवले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना अवमान केले जात आहे याची जाणीव टिका करणार्‍यांना नाही. भविष्यात हीच जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल असे सांगत कुणाचे पार्सल कुठे पाठवायचे हे येणार्‍या निवडणुकीत सर्वसामान्य जनतेने नक्की ठरविले आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी माढा लोकसभा मतदार संघाची जागा शेकापला द्यावी, अशी मागणी जनतेला सोबत घेऊन शेकापचा उमेदवार माढा लोकसभा मतदार संघातून निवडून देवू असे सांगत करत यापुढील काळात मुलमूत गरजांसाठी माझे काम सुरु राहणार असून जीवात जीव असेपयर्र्त सर्वसामान्यांची सेवा करणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.
डॉ.अनिकेत देशमुख म्हणाले, सध्याचे सरकार जातीजातीमध्ये तेड निर्माण करत आहे. अशा गोष्टीना सांगोला तालुका थारा देणार नाही हे आजच्या आपल्या मेळाव्यावरुन दिसून आले आहे. सध्य परिस्थितीला सिंचन गोठला आहे तर पाणी कोठून देणार आहात. लोकांची दिशाभूल करु नका, खोटे नाटक करुन जनतेची दिशाभूल करु नका. सांगोला तालुका हा परंपरेने दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. टेंभू म्हैसाळ योजनेचे पाणी आबासाहेब व नागन्नाथ नाईकवडी यांच्या प्रयत्नातून आले आहे हा इतिहास न पुसणारा आहे. 5 वर्षात पाणी येत असते तर सर्वांनी हेच केले असते अशी टीका करत चंद्रभागा दारी आणण्याचे काम आबासाहेबांनी केले.

यावेळी डॉ.बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख, सुरजदादा बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महाविकास आघाडी व मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते. प्रास्तविक विनायक कुलकर्णी यांनी केले.
मेळाव्याप्रसंगी माजी नगराध्यक्षा राणीताई माने, प्रशांत धनवजीर, प्रा.विठ्ठलराव शिंदे, इंजि.रमेश जाधव, समाधान पाटील, अरुण पाटील, अ‍ॅड.नितीन गव्हाणे, अ‍ॅड.भारत बनकर, अमोल खरात, मनोज ढोबळे, अजित गावडे, दत्ता टापरे, मारुती सरगर, रफिक तांबोळी, विष्णू देशमुख, तुषार इंगळे, गजेंद्र कोळेकर, परमेश्वर कोळेकर, बाळासाहेब पाटील यांच्यासह सरपंच, उपसरपंच, सहकारी संस्थाचे सदस्य, पदाधिकारी, शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.

 रॅलीने वेधले लक्ष
सांगोला शहरात शेकापकडून महात्मा फुले पुतळ्यापासून रॅलीस सुरुवात करण्यात आली होती. यावेळी रॅलीमध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय दिसून आला. रॅली निघालेल्या मार्गावर लाल झेंडयामुळे सर्वत्र शेकापमय वातावरण दिसून आले.उघड्या जीपमध्ये भाई.जयंत पाटील, डॉ.बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख हे उभे होते. हलगी, डॉल्बी आणि तरुणांनी घोषणांमुळे सांगोला शहर दणाणून गेले होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!