सांगोला तालुका

उदनवाडी येथील इफ्तार पार्टीचे द्वारे सामाजिक एकोपा निर्माण करणे हाच उद्देश – शाहरुख मुलाणी

येथील इफ्तार पार्टीचे द्वारे सामाजिक एकोपा निर्माण करणे हाच उद्देश असल्याचे गावातील सुपुत्र ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी सुन्नी जमात मस्जिद मध्ये सांगितले आहे. तर महिलांची इफ्तार पार्टी वेगळी आयोजित करण्यात आली होती.

यावेळी मुलाणी म्हणाले की, आपले मूळ गाव हे कधीही कोणीही सोडू नये. गावाशी आपली नाळ जोडलेलीच असली पाहिजे. याअनुषंगाने गावात समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गावातून जाऊन मुंबईत उदरनिर्वाहासाठी असलो तरी गावातील गावकऱ्यांसाठी मी कायम उपलब्ध आहे असे त्यांनी सांगितले. एकतेचा संदेश घराघरात पोहोचवायला हवा, असे आवाहन त्यांनी केले. “या इफ्तार पार्टीतून बंधूभावाचा संदेश जाईल, असे मला वाटते. मानवता धर्म महत्त्वाचा आहे. त्याशिवाय माणसांचे जीवन शून्य आहे, असे माझे मत आहे असे मुलाणी यांनी सांगितले.

या इफ्तार पार्टी करिता समीर मुलाणी, फिरोज शेख, इर्शाद मुलाणी, फारूक मुलाणी, बालेखान शेख, इलाही मुलाणी, अजमेर शेख आदी मुलाणी व शेख परिवारातील सदस्यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!