बाबुराव गायकवाड यांचे कार्य समाजासाठी आदर्शच – मा.खासदार शरद पवार

माणदेशी माणूस कठीण परिस्थितीशी दोन हात करीत स्वाभीमानाने जगत असतो, हा
माणदेशी माणसाचा स्वभाव-धर्म आहे हे स्पष्ट करुन, बाबुराव गायकवाड यांनी आपल्या
आयुष्यात कष्ट आणि जिददीच्या बळावर शिक्षणासह सार्वजनिक क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य
करुन जीवनात स्वाभीमान बाळगला, त्यामुळे त्यांचे कार्य समाजासाठी आदर्शच असल्याचे
गौरोउदगार राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय क़ृषीमंत्री खासदार शरचद्रंजी
पवार यांनी व्यक्त केले.

मा.बाबुरावजी गायकवाड अमृत महोत्स्व गौरव समितीच्यावेतीने येथील रामकृष्ण्
व्हिला येथे बाबुराव (भाऊ) गायकवाड यांचा सपत्नीक अमृत महोत्सवी सत्कार मा.खासदार
शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी बाबुराव गायकवाड यांच्या “माझी वाटचाल” या आत्म्‍चरित्राचे आणि “कर्तृत्वसंपन्न्‍
भाऊ” या गौरव ग्रंथाचे प्रकाशन सोहळा संपन्न्‍ झाला. यावेळी पेढा तुलाही करण्यात आली.
कार्यक्रमास आमदार शहाजीबापू पाटील, गौरव समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिपकआबा
साळुंखे-पाटील, माजी आमदार विनायक पाटील, माजी आमदार डॉ.राम साळे, माजी आमदार
विलासराव जगताप यांचेसह विविध क्षेत्रातील मान्य्वर,गायकवाड कुटूंबीय उपस्थित होते.
यावेळी खासदार पवार म्हणाले, बाबूराव गायकवाड यांनी सार्वजनिक जीवनात काम
करताना आपल्या स्वच्छ प्रतिमेला अभ्यासाची जोड दिली. जे काम हाती घेतले ते तडीस नेले,
शेती, सहकार, शिक्षण, उदयोग, समाजकारण आणि राजकारण या क्षेत्रामध्ये त्यांनी आपली
स्वतंत्र ओळख निर्माण केली. अल्प्‍शिक्षित असणा-या बाबुराव गायकवाड यांनी उत्त्म शिक्षण
संस्था चालवून, ज्ञानाचा दिप सामान्य्‍ माणसाच्या कुंटूंबामध्ये रोवला. त्यांच्या शैक्षणिक
कार्यामुळे सांगोल्याचे जीवनमान बदलले. कोणतेही काम करताना त्यांनी कोठेही बडेजाव केला
नाही. आपले काम निष्ठेने केले. त्यामुळे ते आज समाजासाठी आदर्श् आहेत.
आम. शहाजीबापू पाटील म्हणाले, बाबुराव (भाऊ) गायकवाड म्हणजे दिलेल्या शब्दाला
पक्का राहणारा माणूस आहे. ते ज्यावेळी माझ्या गाडीत बसले तेंव्हा माझ्या अंगावर गुलाल
पडला. मी दोन वेळा आमदार झालो. भाऊंनी स्वर्गीय संभाजीराव शेंडे यांचा शैक्षणिक वारसा
पुढे तसाच चालू ठेवला आहे. खासदार शरदचंद्रजी पवार हे त्यांचे राजकीय जीवनातील पांडुरंग
आहेत. त्यांनी प्रत्येक संस्था प्रामाणिकपणे चालविली.
आम.दिपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले भाऊंनी जीवनात माणसे जोडण्याचे काम केले.
आपले उदयोग व व्यवसाय प्रामाणिकपणे चालविले. त्यांनी राजकारणात पवार साहेबांच्या
मार्गदर्शनाखाली कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता निष्ठेने काम सुरु ठेवले आहे. त्यांना
दिर्घायुष्य्‍ लाभो आणि त्यांना समाज कामाची संधी मिळो अशी अपेक्षा व्यक्त केली.
आम.विनायक पाटील म्हणाले सार्वजनिक जीवनात बाबुराव गायकवाड यांनी शुन्यातून
विश्व्‍ निर्माण केले आहे. एक प्रमाणिक कार्यकर्ता म्हणून समाजासाठी ते आदर्श आहेत.
आपल्या अमृत महोत्सवी सत्काराला उत्त्र देताना बाबुराव(भाऊ) गायकवाड म्हणाले,
1974 ला पवार साहेबांची आणि माझी ओळख झाली. त्यांच्या आदेशाचे पालन करीत
नोकरीचा राजीनामा दिला. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता जनतेची सेवा केली. पवार
साहेब हे कार्यकर्त्यावर लक्ष देणारे नेते आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर श्रध्दा कायम आहे. म्हणूनच
हा कार्यक्रम देखील त्यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतला आहे. ते आले आणि शुभेच्छा दिल्या,

अतंकरण भरुन आले. शुभेच्छा देण्यासाठी मोठया संख्येने आलेल्या जनसमुदायाचे आभारही
त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम सूत्रसंचालन निविदिका सौ.हुले मॅडम यांनी केले तर आभार गौरव समितीचे
कार्याध्यक्ष प्रा.पी.सी.झपके यांनी मानले. कार्यक्रमास सागोला तालुका उच्च्‍ शिक्षण मंडळाचे
पदाधिकारी, राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कायकर्ते, महिला बचत गटाच्या कार्यकर्त्या,
गावकरी, नातेवाईक, विदयार्थी मोठया संख्येने उपस्थीत होते. कार्यक्रमाचे संयोजन अमृत
महोत्स्व गौरव समतीचे सर्व पदाधिकारी, सांगोला महाविदयालय आणि शिवाजी पॉलीटेनिक
कॉलेज मधील प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेत्र कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button