sangola

निरा उजवा कालव्याचे पाणी पूर्ण क्षमतेने तिसंगी तलावात दाखल ; शेतकऱ्यामध्ये समाधानाचे वातावरण

महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार ; माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील

HTML img Tag Simply Easy Learning    

नीरा उजवा कालव्यातून धरणातील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी सांगोला विधानसभा मतदारसंघातील तिसंगी आणि चिंचोली तलावासह उजवा कालव्याच्या उपपट्यांना तसेच सांगोला शाखा कालव्याला सोडण्याची मागणी आपण केली होती. आपल्या मागणीची दखल घेऊन राज्य सरकारने केवळ 48 तासात कॅनॉल भरून पूर्ण क्षमतेने तिसंगी तलावात पाणी सोडल्याबद्दल आपण राज्य सरकारचे आभारी आहोत. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.

दरम्यान उन्हाळी आवर्तनात चिंचोली आणि तिसंगी तलाव पूर्ण क्षमतेने भरला नव्हता. तसेच उजव्या कालव्याला आणि सांगोला शाखा कालव्याला पूर्णपणे पाणी मिळाले नव्हते. नीरा उजवा कालव्याचे अतिरिक्त पाणी सध्या लाभक्षेत्राला आणि तिसंगीसह चिंचोली तलावाला मिळणार असल्याने सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

वीर देवधर आणि भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा प्रचंड वेगाने वाढत होता. धरणातील अतिरिक्त पाणी नीरा नदीतून समुद्राला सोडण्यापेक्षा दुष्काळी सांगोला विधानसभा मतदारसंघातील तिसंगी आणि चिंचोली तलावात सोडावे अशी मागणी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री कपोले यच्याकडे केली होती.

माजी आमदार दीपक आबांच्या मागणीची त्वरित दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने निरेचे पाणी उजव्या कालव्यातून पूर्ण क्षमतेने तिसंगी तलावात सोडले आहे. लवकरच किसंगीचा तलाव भरल्यानंतर हे पाणी सांगोला तालुक्यातील चिंचोली तलावात सोडण्यात यावे असेही यावेळी माजी आमदार दिपकआबांनी नमूद केले.

————————

 

 चिंचोली तलावाला टेल टॅंक जाहीर करण्याबाबत शासन विचाराधीन

सांगोला विधानसभा मतदारसंघातील तिसंगी येथील तलावाप्रमाणे चिंचोली तलावही निरा उजवा कालव्याच्या शेवटच्या टोकाला असल्याने या तलावाला टेल टॅंक म्हणून जाहीर करावे. अशी मागणी आपण राज्य सरकारकडे केली होती. याबाबतही राज्याचे जलसंपदामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह राज्य सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेतील. याबाबत शासन विचाराधीन आहे असेही माजी आमदार दिपकआबा साळुंखे यांनी स्पष्ट केले.

 

————————

 

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!