वादळी वारे पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागास डॉ.बाबासाहेब देशमुख यांची भेट; तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला तालुक्यातील अनेक गावातील शेतकर्यांना सोमवारी रात्री वादळी वारे व पावसाचा फटका बसला. या वादळी वारे व पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरगरवाडी, अनकढाळ, नाझरे आदी परिसरातील नुकसानग्रस्त भागास शेकाप नेते डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी भेट दिली. शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे.
सांगोल्याला सोमवारी जोरदार वादळी पावसाने झोडपले. शहरात दुपारी हलका तर रात्री 8 वाजलेनंतर वादळी वार्यासह जोरदार मुसळधार पाऊस झाला. दरम्यान अनेक भागात वादळी वारे, विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला.वादळी वारे व पावसामुळे सांगोला तालुक्यातील नाझरे, वझरे, सरगरवाडी परिसरात बागायती शेतीसह, जनावरांचे गोठे, राहत्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागास डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी भेट दिली. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, शेतकरी बांधव, तलाठी व कृषी सहाय्यक उपस्थित होते.