पाचेगावात टेंभु योजनेचा कॅनॉल फुटन शेकडो एकर शेतीचं नुकसान झालेल्या शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी-डॉ.भाई बाबासाहेब देशमुख

सांगोला(प्रतिनिधी):-टेंभु योजनेचा कॅनॉल पाचेगाव गावठाण शेजारून गेला आहे. गत तीन महिन्यापूर्वी जलसंधारणाची पाईप कॅनॉलच्या खालून गेली होती. तद्नंतर जेंव्हा कॅनॉलला पाणी सोडण्यात आले होते तेंव्हा कॅनॉलमध्ये गळती होत असल्याचे काही जागरूक नागरिकांनी संबंधित अधिकार्यांच्या लक्षात आणून दिले होते परंतु तिथे कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने रात्री 12 वाजनेच्या दरम्यान कॅनॉल फुटला व त्यामधून वेगाने वाहणार्या पाण्याने शेती तर गेलीच परंतु शेतीमधील मातीही पाण्याबरोबर वाहून गेली.अचानक फुटलेल्या कॅनॉलमुळे शेकडो एकर शेतीच नुकसान झालं आहे.
नुकसान झालेल्या शेतकर्यांनी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांना आपले गार्हाण मांडले तद्नंतर डॉ. बाबासाहेबांनी सदर ठिकाणी भेट देऊन टेंभु योजनेचे अधिकारी, जलसंधानाचे अधिकारी यांना जाब विचारून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून या शेतकर्यांना लवकरात लवकर शेतीचे झालेले नुकसान व पिकांचे नुकसान याची भरपाई मिळाली पाहिजे अशा सूचना केल्या.
तसेच कॅनॉल मध्ये दोन्ही बाजूला झाडया-झुडपांचं साम्राज्य निर्माण झालं आहे ते संबंधित अधिकार्यांच्या ही निदर्शनास आणून दिले.सदर नुकसान ग्रस्त शेतकर्यांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी केल्याची माहिती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.
——————-
मागील आठवड्यात पाचेंगावात पाण्याचं पूजन झालं होतं अन काल रात्री झालेल्या या घटनेने शेकडो एकर शेतीचं नुकसान झालं हे कुणाचं अपयश ? गावात घुसलेल्या पाण्याच्या आजूबाजूच्या घरातील लोकांच्या जीविताचा प्रश्न उभा राहिला तो कोणामुळे ? जलसंधारणच्या या निकृष्ट दर्जाच्या कामाला जवाबदार कोण ???
डॉ.बाबासाहेब देशमुख