राजकीय

‘तुम्ही बच्चू कडूंना घरात घुसून मारेन का म्हणालात?’ रवी राणांनी दिलं उत्तर..

म्हणाले “जर तलवारीने कोथळा काढत…”

राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादाला पूर्णविराम मिळाला असताना आता नव्याने वाकयुद्ध सुरु झालं आहे. रवी राणा यांनी घरात घुसून मारण्याची भाषा केल्याने बच्चू कडू समर्थकही आक्रमक झाले आहेत. दरम्यान रवी राणा यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वाद मिटल्याचा दावा करत, विधानाचा चुकीचा अर्थ लावला असल्याचं म्हटलं आहे.

“वाद पूर्णपणे मिटला आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आदेश आमच्यासाठी सर्वस्व आहेत. म्हणून बैठकीनंतर लगेचच मी तो वाद मिटल्याचं जाहीर केलं,” असं रवी राणा म्हणाले.

घरात घुसून मारेन’ वक्तव्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले, ते वक्तव्य कोणासाठी नव्हतं. कोणी जर आम्हाला मारु, कोथळा काढू, हात छाटून टाकू, तोंड रंगवू असं धमकावत असेल, त्यांच्यासाठी हे वक्तव्य होतं. ते वक्तव्य कोणालाही उद्देशून नव्हतं. कोणी जर तलवारीने आमचा कोथळा काढत असेल, मारुन टाकत असेल तर जीव वाचवण्यासाठी ते करावं लागतं.

काय म्हणाले होते रवी राणा –

बच्चू कडू यांनी अमरावतीत झालेल्या सभेत बोलताना पहिली वेळ असल्याने रवी राणा यांना माफ करतो असं विधान केलं होते. यावर रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. “हा वाद आता मिटला आहे. पण कोणी मला दम देत असेल, तर ते योग्य नाही. रवी राणाने उद्धव ठाकरेंचा दम मोजला नाही. त्यामुळे बच्चू कडू माझ्यासाठी छोटा विषय आहे. बच्चू कडू जर दम देऊन बोलत असेल, तर त्यांना जशास तसं उत्तर देण्यासाठी मी सक्षम आहे”, अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली होती.

“प्रेमाच्या भाषेवर रवी राणा एकदा नाही, तर १० वेळा माघार घेण्यास तयार आहे. पण कोणी दम देऊन बोलत असेल, तर त्याला घरात घुसून मारण्याची हिंमतही माझ्यात आहे”, अशा इशाराही त्यांनी बच्चू कडू यांना दिला.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!