सांगोला तालुका

वृक्षारोपणाच्या चळवळीत ग्रामस्थांनी व समाजाने सक्रिय योगदान द्यावे: तहसीलदार संजय खडतरे

महूद, ता.  ७ : महूद येथील कासाळगंगा ओढ्याच्या  तीरावरती वृक्षारोपण करून आनंदवन फुलविण्याचे सुरू असलेले काम प्रेरणादायी आहे.महूद येथील तरुणांनी सुरू केलेल्या या वृक्षारोपणाच्या चळवळीत ग्रामस्थांनी व समाजाने सक्रिय योगदान द्यावे,असे आवाहन सांगोल्याचे तहसीलदार संजय खडतरे यांनी केले आहे.
महूद येथील श्री समुह सदस्य व दीपक धोकटे यांच्यासह युवकांनी एकत्र येऊन वृक्ष तुमचे ; जबाबदारी आमची या उपक्रमातून वृक्षारोपणाचे काम हाती घेतले आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून येथील लिंगायत समाज स्मशानभूमीच्या पाठीमागे असलेल्या कासाळगंगा ओढ्याच्या तीरावरती वृक्षारोपणाचा उपक्रम सुरू आहे.कासाळगंगा ओढ्याच्या दोन्ही तीरावरती वड,पिंपळ,आंबा,कडुलिंब अशा पारंपारिक वृक्षांची लागवड करण्यात येत आहे.लोकसहभागातून रोपे व त्यासाठीची संरक्षक जाळी घेण्यात येत आहे.ही रोपे जगवण्याची जबाबदारी येथील श्री समुह सदस्य व दीपक धोकटे यांनी घेतली आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या लाडक्या व्यक्तींचा वाढदिवस,प्रिय व्यक्तींच्या आठवणी,लग्नाचा वाढदिवस अशा विविध संस्मरणीय दिनानिमित्त येथे वृक्षारोपण केले जात आहे.
सांगोल्याचे तहसीलदार संजय खडतरे यांनी नुकतीच या उपक्रमास भेट दिली.तहसीलदार श्री.खडतरे यांच्या हस्ते या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी मंडलाधिकारी दिनेश भडंगे,तलाठी गणेश भुजबळ,माजी उपसरपंच दिलीप नागणे,अनिकेत महाजन,चंद्रशेखर ताटे,दीपक धोकटे आदी उपस्थित होते.श्री.खडतरे बोलताना पुढे म्हणाले की,पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे.त्यासाठी वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही.येथील युवकांनी सुरू केलेल्या या समाजोपयोगी उपक्रमास जनतेने सहकार्य करावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!