सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी नी पाळला माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेला दिलेला पाण्याचा शब्द…….

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.. काल मुंबईमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेर जलनियोजनास मान्यता देण्यात आली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंगमध्ये कृष्णा खोरे चे सचिव कार्यकारी संचालक, जिल्हाधिकारी ,प्रशासकीय अधिकारी, उपस्थित होते यावेळी कृष्णा प्रकल्पाचे फेर जलनियोजन करण्यात आले आहे. दि.३१/१/२०२३ रोजी माढा मतदार संघातील विविध विकासकामे व मतदार संघातील पाणी प्रश्नावर आग्रही भूमिका घेणारे आमदार जयकुमार गोरे व सांगोला चे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या सातत्याने पाठपुराव्यामुळे वरील प्रश्नासंदर्भामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची बैठक आयोजित केली होती .

यावेळी कृष्णा प्रकल्पाच्या फेर जलनियोजनास मान्यता द्यावी व दुष्काळी भागातील ज्या वंचित गावांना कोणत्याही योजनेतून पाणी उपलब्ध होऊ शकत नाही अशा गावांना फेर जलनियोजनातून या सिंचन प्रकल्पातून पाणी द्यावे अशी मागणी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी केली होती त्यास आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मान्यता देऊन माढा लोकसभा मतदार संघातील उत्तर कोरेगाव या गावांना वसना .५२ (अर्धा)टीमसी वगना योजनेतून .५९ (अर्धा )टीमसी पाणी उपलब्ध होणार आहे त्यामुळे उत्तर कोरेगाव चे जनतेला पाणी देणे चा मार्ग सुकर झाला आहे व या भागातील योजना मार्गी लागतील जिहे काठापूर योजनेतून २.५७ टीएमसी असे एकूण ३.६९ टीएमसी व टेंभू प्रकल्पातून मान खटाव तालुक्यातील वंचित दुष्काळी 48 गावांना २.५० टीमसी व सांगोला तालुक्यातील 41 गावांना २ टीमसी या योजनेतून पाणी मिळणार आहे म्हणजेच माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी व वंचित गावांना ८.१८ टीएमसी पाणी मिळणार आहे .भविष्यात माढा लोकसभा मतदार संघातील कोणते ही पाणी योजना व कोणतेही गाव पाण्यावाचून वंचित राहणार नाही. अशी काळजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतली व मतदार संघातील जनतेला दिलेला पाण्याचा शब्द पाळला आहे. मी या सरकारचे मनापासून अभिनंदन करणार आहे, कारण लोकसभा निवडणुकीत मी शब्द दिला होता की यानंतर माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये पाणी प्रश्नावर निवडणूक होणार नाही.

या मतदारसंघातील सर्व प्रश्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत व राज्य सरकार यांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला आहे . मग निरा देवधर ,धोम बलकवडी, जिहे कटापूर ,टेंभू विस्तारित पाणी योजना, माढा, करमाळा, पाणी योजना मी सर्व लोकप्रतिनिधीं,भाजप व शिवसेना पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे..

आता या सर्व कामांची टेंडर झालेली आहेत काही कामे सुरू आहेत लवकरच मतदार संघामध्ये या सर्व पाणी योजनांचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व महाराष्ट्राचे सर्व मंत्रिमंडळाच्या उपस्थितीमध्ये घेण्याचा माझा मानस आहे व राहिलेले प्रश्न आता जनतेच्या आशीर्वादाने सोडवायचे आहेत असे हे मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!