लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी लिखाणातून व विचारातून सामाजिक क्रांती घडवून वंचित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, आज त्यांच्या विचारांची गरज आहे असे मत सांगोला तालुका वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्षपत्रकार रविराज शेटे यांनी वझरे ता. सांगोला येथे जयंती उत्सवात मत व्यक्त केले.
तर जयंती उत्सव कार्यक्रमात सर्व धर्मीय समाजाने भाग घेतला त्याचा आनंद आहे यापुढेही असाच भाग घेऊन सहकार्य करावे व जयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी असे युवा नेते नितीन भाऊ रणदिवे यांनी व्यक्त केले. सुरुवातीस प्रास्ताविक काकास वाघमारे यांनी केले. तर प्रतिमेचे पूजन सरपंच संजय कोकरे, माझी प्राचार्य के. वाय. पाटील, उपसरपंच बाबुराव जाधव, माजी सरपंच महादेव पवार, अशोक पाटील, सुभाष कोकरे, सचिन कोकरे, आनंद कोकरे, दीपक शिंदे, प्रशांत कदम, मल्हारी चव्हाण, लक्ष्मण वाघमारे, भिकू वाघमारे इ. च्या हस्ते करण्यात आले. तर जयंती उत्सव मिरवणुकीचे उद्घाटन युवा नेते नितीन भाऊ रणदिवे व पत्रकार रविराज शेटे यांचे हस्ते करण्यात आले. .
सदर प्रसंगी उमेश चव्हाण, दत्तात्रय वाघमारे, पांडुरंग वाघमारे, गणेश वाघमारे, ज्ञानेश्वर वाघमारे, भीमराव वाघमारे, बापू वाघमारे, मच्छिंद्र वाघमारे, गोरख वाघमारे, नाना वाघमारे, महादेव वाघमारे, सर्व समाज बांधव, महिला, युवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व सर्वांचे आभार युवा नेते महेश वाघमारे यांनी मानले.