सांगोला तालुकामहाराष्ट्रशैक्षणिक
जीवनात यशस्वी होण्यासाठी कृतिशिलता महत्वाची – डॉ शालिनी कुलकर्णी
उत्कर्ष विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
सांगोला – जीवनात यशस्वी व्हावयाचे असेल तर विद्यार्थ्यानी बुद्धीचा योग्य वापर करावा,कृतिशीलता जोपासावी व समाजजीवनासी समरस व्हावे,असे विचार माताबालक उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉ.शालिनी कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
उत्कर्ष विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात त्या बोलत होत्या.या प्रसंगी व्यासपीठावर संस्था उपाध्यक्ष माधवी देशपांडे, सचिव प्रा.नीलिमा कुलकर्णी,प्राचार्य सुनील कुलकर्णी, प्राथमिक विद्यालयाच्य मुख्याध्यापिका विश्रांती मागाडे – बनसोडे, बालक मंदिर मुख्याध्यापिका सुनीता कुलकर्णी,प्रा.राजाभाऊ ठोंबरे आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमात दहावीतील काही विद्यार्थ्यानी मनोगत व्यक्त करताना गुरुजन,विद्यालय व संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.गुरू -,शिष्य नाते ,संस्कार व शाळेबद्दल असणारी ओढ या विषयावर भाष्य करून प्रा.नीलिमा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यानी भविष्यात मूलभूत विज्ञान विषयात संशोधन करून भारताच्या गौरवशाली परंपरेत मोलाचे योगदान द्यावे असे मत प्रा. राजाभाऊ ठोंबरे यांनी व्यक्त केले.उत्कर्ष विद्यालयात दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यासाठी एम एच टी – सी ई टी चे वर्ग दहा एप्रिल पासून सुरू होत आहेत,त्याचा विद्यार्थ्यानी लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य सुनील कुलकर्णी यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या देशपांडे मॅडम यांनी शिक्षक व विद्यार्थ्यानी वर्षभर केलेल्या परिश्रमास शंभर टक्के निकालाची परंपरा सुरू राहणार असल्याचे मत व्यक्त केले. शिक्षका पैकी सर्वगोड मॅडम,सावंत सर,राऊत सर, गोतसूर्य सर यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक मुक्तानंद मिसळ,आभर प्रदर्शन क्रांती सूर्यवंशी तर सूत्र संचालन भोसले सर यांनी केले.