गहाळ झालेले मोबाईल पोलिसांच्या प्रयत्नाने परत मिळाले; 20 तक्रारदारांचे चेहरे खुलले

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणाहुन गहाळ झालेल्या मोबाईलचा सायबर पोलीस ठाणे यांचे मदतीने तांत्रिक विश्लेषणाव्दारे शोध घेवुन 6 लाख 50 हजार रुपये किंमतीचे मोबाईल तक्रारधारकांना परत करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे यांनी दिली.

सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणाहुन दिनांक 01 जून 2024 ते दिनांक 30 जून 2024 रोजीपर्यत एकुण 35 मोबाईल गहाळ झालेल्या घटना घडल्या होत्या. सदर गहाळ झालेल्या मोबाईलचा सायबर पोलीस ठाणे यांचे मदतीने तांत्रिक विश्लेषणाव्दारे शोध घेवुन गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेतला असता त्यातील अंदाजे किमंत 6 लाख 50 हजार रुपयांचे एकुण 20 मोबाईल मिळून आल्याने ते तक्रारदारांना पोलीस निरीक्षक सांगोला व पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांचे हास्ते सांगोला पोलीस ठाणे येथे परत करण्यात आले आहेत.

वैभव नरळे, स्तुजा स्वामी, विलास पाटील, भीमराव चव्हाण, सागर देवकते, हर्षवर्धन लवटे, आजमुतुल्ला मुजावर, महादेव सावनजी, साहिल बागवान, नागनाथ वाकिटोल, ज्ञानेश्वर गायकवाड,यासीन मुल्ला, शुभम सांगोलाकर, ऐजुल हक, रुपाली येलपले, संजय फलके, किरण लोखंडे, विक्रम टाकळे, रत्नजीत चव्हाण,प्रसाद कठाळे आदी
मोबाईल धारकाचे मोबाईल परत करण्यात आले आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे,अपर पोलीस अधिक्षक प्रतिम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड़ , पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोकों रतन जाधव, पोकों शहाजहान शेख यांनी केली आहे. सदर कारवाईमुळे तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले आहे. या पुढे मोबाईल गहाळ हरविले असल्यास त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवावी असे आवाहन सांगोला पोलीस ठाणे तर्फे करण्यात येत आहे.

चौकट:-गरीबीची परिस्थिती असताना देखील कर्ज काढून सर्वसामान्य नागरिकांनी घेतलेले मोबाईल हरवले असतात किंवा चोरीस गेलेले असतात. अशा लोकांचे मोबाईल परत मिळाल्याने जन सामान्यातुन पोलिस प्रशासनाविषयी प्रशंसनीय भावना व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button