महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (नरेगा) अंतर्गत पात्र असलेले व फळबाग लागवडीसाठी ईच्छुक असलेले शेतकरी बांधवांनी फळबाग लागवडीचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषि विभागामार्फत कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत डाळिंब , आंबा, पेरू ,सिताफळ, लिंबू ,नारळ, आवळा, चिंच,केळी ,ड्रॕगनफ्रूट,द्राक्षे आदी फळपिकांची लागवड करता येते. जाॕबकार्डधारक व अल्पभुधारक म्हणजे ज्यांची एकुण जमिनधारणा २.० हे किंवा त्यापैक्षा कमी आहे असे शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र आहेत. अनुसुचित जाती व अनु.जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधव २.० हे पेक्षा जास्त जमिन धारणा असले तरी लाभ घेऊ शकतील. या योजनेअंतर्गत लाभ घेणेसाठी ७/१२ उतारा, ८ अ उतारा, आधारकार्ड , बँक पासबुक , जाॕब कार्ड व ग्रामसभेचा लाभार्थी निवडीचा ठराव ईत्यादी कागदपत्रांसह अर्ज कृषि सहाय्यक किंवा मंडळ कृषि अधिकारी कार्यालयास सादर करावा.
अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक ,कृषि पर्यवेक्षक , मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे.
Back to top button
Jaxx Wallet Download
Jaxx Liberty Wallet
Jaxx Wallet
gem visa login
gem visa login australia
gem visa