सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

टेंभूच्या फेरनियोजनातून सांगोल्याला अतिरिक्त दोन टीएमसी पाणी मंजूर – चेतनसिंह केदार-सावंत

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्याचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील आणि टेंभू अधिकाऱ्यासोबत झालेल्या टेंभू योजनेच्या पाणी वाटपाच्या फेरनियोजन बैठकीत सांगोला तालुक्याला अतिरिक्त दोन टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.

भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, सांगोला तालुक्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालवा, उजनीचे दोन टीएमसी पाणी, जिहे कठापूर या सर्व सिंचन प्रकल्पातून पाणी सोडून हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील आणि मी स्वतः कटिबद्ध आहोत. २०१९ पासून खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार शहाजीबापू पाटील यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. नीरा उजवा कालव्याचे टेल टू हेड पद्धतीने पाणी सोडण्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी आदेश दिल्याने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे.

टेंभू उपसा सिंचन योजनेच्या फेरनियोजन पाणी वाटपाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील आणि टेंभूचे अधिकारी यांच्यात झाली यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी टेंभूच्या फेर पाणी वाटपाच्या नियोजनात महामंडळाने सादर केलेल्या प्रकल्पाच्या सुधारित फेरपाणी वाटपाचा आराखडा सादर करण्यात आला. या फेरनियोजन बैठकीत सांगोला तालुक्याला टेंभू योजनेतून अतिरिक्त दोन टीएमसी पाणी देण्याचे देण्याचा निर्णय मंजूर झाला आहे. तसेच टेंभू योजनेतून माण नदीवरील बंधारे भरून देणार असल्याची माहिती खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी दिली आहे. टेंभू योजनेचे पाणी वाटपाचे फेरनियोजनानंतर सांगोला तालुक्याला अतिरिक्त दोन टीएमसी पाणी मिळणार असल्याने सांगोला तालुक्याचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. सांगोला तालुक्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवून तालुक्यातील हजारो हेक्टर शेती ओरिताखाली आणून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक प्रगती साधण्यासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील आणि मी स्वतः प्रयत्नशील असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

खा. रणजितसिंह निंबाळकरांनी निवडणुकीत दिलेला शब्द पाळला…

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी 2024 च्या निवडणुकीत पाण्याचा प्रश्न राहणार नाही असे आश्वासन दिले होते. त्यानुसार गेल्या पाच वर्षात खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी टेंभू, म्हैसाळ, निरा उजवा कालवा, कृष्णा भीमा स्थिरीकरण, जिहे कठापूर योजना, उजनीचे दोन टीएमसी पाणी या सर्व सिंचन प्रकल्पासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच या सर्व सिंचन प्रकल्पातून सांगोला तालुक्याला पाणी सोडण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला आहे. 2019 च्या निवडणुकीत मतदारांना दिलेल्या आश्वासनाचीपुर्ती करून खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी निवडणुकीत दिलेला शब्द पाळला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!