महाराष्ट्र

मोठी बातमी: 36 तास नॉट रिचेबल श्रीनिवास वनगा अखेर परतले, पण काही मिनिटं घरी थांबून पुन्हा घराबाहेर पडले

शिंदे गटाकडून पालघर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रचंड दुखावलेले विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे सोमवारी संध्याकाळपासून बेपत्ता होते. अखेर 36 तास उलटल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना फोन करुन आपण सुखरुप असल्याचे सांगितले.

त्यानंतर श्रीनिवास वनगा  हे पालघरमधील आपल्या घरीही आले होते. घरी आल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांशी काहीवेळ बातचीत केली. त्यानंतर श्रीनिवास वनगा हे कुटुंबीयांना सांगून पुन्हा घराबाहेर पडले.

श्रीनिवास वनगा यांचे दोन्ही मोबाईल फोन सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल लागत होते. वनगा यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले होते. त्यामुळे वनगा यांचे कुटुंबीय चिंतेत होते. अखेर मंगळवारी रात्री उशीरा श्रीनिवास वनगा कोणालाही पत्ता लागून न देता घरी आल्याचे सांगितले जाते. प्राथमिक माहितीनुसार, श्रीनिवास वनगा हे रात्री दोन ते तीनच्या दरम्यान घरी आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांची ही संपर्क साधल्याचे समजते. ते रात्री त्यांच्या मित्रांसोबत गेले आहेत असं त्यांच्या पत्नीने सांगितलं असून ते व्यवस्थित असल्याचंही सांगितलं आहे

सोमवारी संध्याकाळपासून ते आपल्या एका मित्राच्या घरी होते. ते सध्या प्रचंड डिप्रेशनमध्ये आहेत. शांत झाल्यावर ते घरी आले. आमच्याशी बोलून ते पुन्हा घराबाहेर पडले, अशी माहिती श्रीनिवास वनगा यांच्या पत्नीने दिली. मात्र, वनगा पुन्हा कुठे गेले, याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

शिंदे गटाने श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी पालघर विधानसभेतून  राजेंद्र गावित यांना संधी दिली होती. श्रीनिवास वनगा यांनी सुरतच्या बंडावेळी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. त्यामुळे आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती. परंतु, शिंदे गटाने राजेंद्र गावित यांचे नाव जाहीर केल्यानंतर श्रीनिवास वनगा यांनी पत्रकारपरिषद घेऊन नाराजी व्यक्त केली होती. ‘उद्धव ठाकरे हे देवमाणूस होते. मी घातकी माणसासोबत गेलो आणि माझा घात झाला’, असे श्रीनिवास वनगा यांनी म्हटले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button