राजकीयमहाराष्ट्र

रवी राणांची दिलगिरी, पण बच्चू कडूंचे वेगळेच सूर!

मेळाव्यात भूमिका जाहीर करणार..

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांनी आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्या वादात मध्यस्थी केली. यानंतर रवी राणा यांनी ५० खोके आणि गुवाहाटी दौऱ्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून शब्द मागे घेतले. तसंच रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली. पण आता बच्चू कडू यांचा वेगळाच सूर असल्याचे दिसून आले. वादावर स्पष्टपणे न बोलता बच्चू कडू हे आता आपली भूमिका कार्यर्त्यांच्या मेळाव्यातून जाहीर करणार आहेत.

रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर बच्चू कडूही वादावर पडदा टाकतील अशी अपेक्षा होती. मात्र बच्चू कडू यांनी रवी राणांवर केलेल्या टीकेवरून आपले शब्द मागे घेतले नाहीत आणि वाद मिटल्याचंही स्पष्ट केलं नाही. आपण आज कार्यकर्त्यांशी चर्चा आणि उद्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून भूमिका जाही करू, असं बच्चू कडू म्हणाले. यामुळे बच्चू कडू आता काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!