महाराष्ट्र

पीकस्पर्धा रब्बी हंगाम 2024 साठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन- कृषीअधिकारी दिपाली जाधव

सांगोला(प्रतिनिधी):-शासन निर्णय क्र.पीकस्पर्धा -2020/प्र.क्र 113/4ए ,दि.20 जुलै 2023 अन्वये रब्बी हंगाम 2024 मध्येही पिकस्पर्धा मागील वर्षीप्रमाणे तालुका,जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येत आहेत.त्यानुसार कृषि विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2024 मध्ये सर्वसाधारण गटासाठी व आदिवासी गटासाठी ज्वारी,गहू,हरभरा,करडई या पिकस्पर्धेचे सांगोला तालुक्यात आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सांगोला तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव यांनी दिली.

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेते वाढ करणेत येते.अशा प्रयोगशिल शेतकर्‍यांना ,मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्यासहन देउन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती ,मनोबल यामध्ये वाढ होउन आणखी उमेदीने नवनवीन अद्यायावत तंञज्ञानाचा वापर केला जाईल यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकर्‍यांचे योगदान मिळेल.

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12, 8-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकर्‍याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा अर्जासोबत सादर करावा.
रब्बी  हंगामामध्ये ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल – प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील.पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.300/- राहील व आदिवासी गटासाठी रक्कम रु.150/- राहील.
तालुका पातळी :  पहिले बक्षिस पाच हजार रुपये, दुसरे बक्षिस तीन हजार रुपये, तिसरे बक्षिस दोन हजार रुपये.
जिल्हा पातळी  : पहिले बक्षिस दहा हजार रुपये, दुसरे बक्षिस सात हजार रुपये, तिसरे बक्षिस  पाच हजार रुपये
राज्य पातळी : पहिले बक्षिस 50 हजार रुपये, दुसरे बक्षिस 40 हजार रुपये, तिसरे बक्षिस  30 हजार रुपये

रब्बी हंगामामध्ये सन 2024 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2024 असून याबाबत तालुका कृषि अधिकारी श्रीमती.दिपाली जाधव यांनी सर्व कृषि बंधू व भगिनींना पिकस्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.पिकस्पर्धाबाबत अधिक माहितीसाठी शेतकरी बंधु व भगिनींनी संबंधित कृषि सहाय्यक व तालुका कृषि अधिकारी कार्यालय,सांगोला यांचेशी संपर्क साधावा.

चौकट:-स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकर्‍याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणार्‍या शेतकर्‍याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान  40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!