दिपकआबांचा आगार प्रमुखांना एक कॉल,  लक्ष्मीनगर परिसरातील विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व

अनेक दिवसापासून बंद असलेली एस टी पुन्हा सुरू ; महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा प्रश्न मिटला 
नेहमीच आपल्या “ऑन द स्पॉट” कामाच्या पद्धतीमुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असलेल्या मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी लक्ष्मीनगर ता. सांगोला येथील विद्यार्थ्यांचा अनेक दिवसांचा प्रश्न चुटकीसरशी मार्गी लावला आहे. दिपकआबांच्या एकाच कॉलमुळे अनेक दिवस बंद असलेली एस.टी. बस लक्ष्मीनगर गावाला पुन्हा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा गावभेट आणि जनसंवाद दौरा सुरू आहे. लक्ष्मीनगर ता. सांगोला येथे माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा गाव भेट दौरा पोहोचला असता येथील महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या गावला एस.टी. बस नसल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींचे प्रचंड हाल होत असल्याची तक्रार माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांना केली होती. यावेळी दिपकआबांनी क्षणाचाही विलंब न करता सांगोला बसस्थानकाच्या आगार प्रमुखांना याबाबत जागेवरूनच कॉल करून लक्ष्मीनगर गावाला सकाळी ७ वा सांगोल्याच्या दिशेने जाणारी आणि दु. १२.३० वा सांगोल्याहून लक्ष्मीनगरला येणारी एसटी सुरू करण्याची सूचना दिली होती.
दिपकआबांच्या सूचनेनुसार अखेर लक्ष्मीनगर ता. सांगोला गावाला स. ७ वा. लक्ष्मीनगर ते सांगोला आणि दुपारी १२.३० वा सांगोला ते लक्ष्मीनगर अशी नियमितपणे एस.टी. बस सुरू झाल्याने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी मधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
१) शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह अन्य प्रवाशांचीही होणार सोय…! 
माजी आमदार दिपकआबांच्या प्रयत्नामुळे लक्ष्मीनगर गावाला नियमित एसटी सेवा सुरू झाल्याने एखतपुर, खरातपाटी, मठवस्ती, ठोंबरेवाडी, अचकदानी आणि लक्ष्मीनगर परिसरातील शेकडो शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींची तसेच महिला आणि अन्य प्रवाशांची सोय झाली आहे. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थी आणि प्रवाशी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांना धन्यवाद देत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button