महाराष्ट्रशैक्षणिक

नातेपुते जि प प्रा शाळेचा व्दि शतकी सुवर्ण  महोत्सव 

नातेपुते(सुनिल ढोबळे):- महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी १०५ हुत्माच्या  बलीदानातुन महाराष्ट्राचा अमृत  कलश आणला ग्रामस्वराज्य निर्माण व्हावे  म्हणून जिल्हा परिषद ,पंचायत समिती व ग्रामपंचायत यांना विशेष अधिकार बहाल करण्यात आले. ज्ञानाची गंगा सर्व सामान्यांच्या झोपडीपर्यंत पोहचावी म्हणून जिल्हा परिषेदेच्या माध्यमातून गावोगावी शाळा उघडण्यात आल्या मौजे नातेपुते येथे सन-१८२३ साली स्वातंत्र्य पुर्व काळात प्राथमिक शाळेची स्थापना करण्यात आली.यंदाच्या वर्षी शाळा व्दि शतकी सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे परंतु शासनाच्या दुर्लक्षेमुळे ही शाळा उपेक्षित राहीली आहे या शाळेमध्ये शिकुन अनेक नामांकीत पुढारी ,अधिकारी ,डाॕक्टर ,वकील व उद्योजक म्हणून नावलौकिक असा आहे आज ही या शाळेमध्ये शिकलेले बरेच राज्यकर्ते गावचा गाडा हाकत आहेत परंतु आज ह्या शाळेची दुर्दशा पहावत नाही.
शाळेमध्ये आर्थिक दुर्बल गोरगरीब कुटूंबातील विद्यार्थी शिक्षण घेत असुन शाळेचा पट अवघा ५४ असा आहे. इ १ली ते ७वी पर्यंत येथे शिक्षण दिले जाते या शाळेमध्ये एक जिल्हा बदली शिक्षक व एक कन्या प्रशाला शाळेच्या शिक्षिका शिकवत आहेत.भारत देश हा जागतिक गुरू होत असताना या शाळेतील विद्यार्थी अधुनीक भारताच्या शैक्षणिक कसोटीमध्ये उतरतील काय ? याची शाहनीशा घेणे गरजेचे आहे अकलूजचे मेडिकल हब प्रसिद्ध करणारे प्रसिद्ध डाॕ एम के इनामदार हेही याच शाळेचे विद्यार्थी आहेत.आज या शाळेचा व्दि शतकी सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना ह्या शाळेकडे  लक्ष देण्याची गरज आहे असे सुजान नागरिकांमधुन बोलले जात आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!