सांगोला तालुका

कमलापूर ते गोडसेवाडी बायपास रस्ता बनला मृत्यूचा सापळा; नॅशनल हायवे लगतचा बायपास ताबडतोब वाहतुकीसाठी खुला करावा-युवा नेते बाबुराव.(बी.आर) बंडगर

कमलापूर (प्रतिनिधी)-नॅशनल हायवे 166 लगत सांगोला शहरापासून नजीकचे गाव असणारे कमलापूर येथील नॅशनल हायवेच्या लगत कमलापूर ते गोडसेवाडी बायपास रस्ता बनला मृत्यूचा सापळा बनला आहे.
नॅशनल हायवेच्या अधिकार्‍याच्या गलाधन कारभारामुळे कमलापूर गावाहून जात असताना गोडसेवाडीच्या लगत वाहतूक करत असताना अजनाळे, चिनके, बलवडी, मंगेवाडी, लोटेवाडी, खवासपूर, नाझरे, वझरे, चिनके, आटपाडी इत्यादीसाठी हा मार्ग नेहमीच वरदळीचा ठरला याचा परिणाम म्हणून लोक थेट नॅशनल हायवेवर चार चाकी व दोन चाकी वाहने घेऊन येतात. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून सदरचे काम प्रलंबित आहे. आतापर्यंत अनेक अपघात अक्षरशः न पाहणारे झालेले आहेत. अनेक निष्पाप लोकांचा यामध्ये बळी गेला आहे. काही लोकांना कायमचे अपंगत्व आले आहे.काही लोकांचे संसार उध्वस्त झालेले आहेत.छोट्या मोठ्या गाड्यांचे अक्षरशा कधी न भरून निघणारे नुकसान झाले आहे.अपघातामध्ये काही लोकांचं परिवार उध्वस्त झाला आहे.
नॅशनल हायवेच्या अधिकार्‍यांनी ताबडतोब कमलापूर गोडसेवाडी बायपासचा प्रश्न कायमचा निकाली काढावा. आणि अनेक असंख्य लोकांचे होणारे अपघात टाळावेत. लवकरात लवकर बायपास दुरुस्ती करून वाहतुकीसाठी खुला करावा असा असा इशारा कमलापूरचे युवा नेते बाबुराव.बी.आर.बंडगर यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!