सांगोला तालुकाराजकीय

स्व.आबासाहेबांकडून राजकारणामध्ये निष्कलंक राहुन समाजसेवा- वामन मेश्राम;

वामन मेश्राम यांनी डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांची घेतली सदिच्छा भेट
सांगोला(प्रतिनिधी):- सध्या स्व.आबासाहेबांसारखे नेते दुर्मिळ झाले आहेत.राजकारणामध्ये निष्कलंक राहुन समाजसेवा करणे फार अवघड काम आहे. हे काम स्व.आबासाहेबांनी संपूर्ण हयातभर केले.आबासाहेबांनी विचारधारा कधीच सोडली नाही. विचारधारेशी तडजोड कधी केली नाही. सांगोला विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत असताना तालुक्यांमध्ये सर्वधर्म समभाव रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. त्याचप्रमाणे मतदार संघाचा विकास करीत असताना शेवटच्या घटकाचा विचार करुन विकास साधला असून शेतकरी, कष्टकरी, कामगार, दलित व महिला यांच्या सन्मानासाठी प्रयत्न केले आहेत असे प्रतिपादन वामन मेश्राम यांनी व्यक्त केले.
बामसेफचे सर्वेसर्वा मा.वामन मेश्राम हे सोलापुर जिल्हा दौर्‍यावर आले होते.. रविवारी दिनांक 26/2/2023 रोजी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली. प्रारंभी स्व गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन केले.
डॉ बाबासाहेब देशमुख यांना बोलताना मा.वामन मेश्राम म्हणाले की.आपणास विचारांचा वारसा आहे.आपण आबासाहेबांच्या विचारांवर पाऊल टाकत समाजसेवा करावी एवढीच अपेक्षा आपणाकडुन ठेवत असलेले त्यांनी सांगितले.
सदर भेटी दरम्यान बहुजन नेते बापुसो ठोकळे, किशोर बनसोडे, दिपक बनसोडे, आबासाहेब शेजाळ गुरुजी, बशीरभाई तांबोळी, आकाश व्हटे इत्यादी नेते उपस्थित होत अशी माहिती शेकापचे प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!