शेतकरी बांधवाच्या पाठीमागे शेकापक्ष खंबीरपणे उभे राहणार- डॉ.बाबासाहेब देशमुख; डॉ.बाबासाहेब देशमुख यांचेकडून विविध मागण्यांचे तहसीलदार यांना निवेदन
सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला तालुक्यातील मुक्या जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करुन द्यावे, शेतीसाठी व पिण्यासाठी टँकरद्वारे पाणी उपलब्ध करुन द्यावे व दुधाचे दरवाढीबाबत तात्काळ निर्णय घ्यावा याबाबत पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व शेकापचे लोकप्रिय युवा नेते डॉ.बाबासाहेब देशमुख यांचेकडून तहसीलदार सांगोला यांना काल गुरुवार दि.13 जुलै रोजी निवेदन दिले.
शेतकरी बांधवाच्या पाठीमागे शेतकरी कामगार पक्ष खंबीरपणे उभे राहणार असून शेतकर्यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही. शेतकरी बांधवासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन लढाई लढू असा आक्रमक इशारा डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी दिला असून लवकरात लवकर मागण्या मान्य करुन शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा असे आवाहन त्यांनी केले.
सध्या महाराष्ट्रात मान्सुन उशीरा झालेमुळे पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिवारात असलेली उभी पिके जळून जाऊ लागली आहेत.तरी सर्व सिंचन योजनेद्वारे शेतीसाठी पाणी तसेच टँकरद्वारे वाडी वस्तीवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणेत यावी. तसेच जनावरांच्या चार्याचा प्रश्न झाला असून जनावरांसाठी चारा उपलब्ध करणेत यावा.तसेच महाराष्ट्र सरकारने दूध दराबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य, मुंबई, पालकमंत्री, सोलापूर जिल्हा, सोलापूर, दुग्ध विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हाधिकारी साो, सोलापूर जिल्हा, सोलापूर. यांना देण्यात आल्या आहेत.
सदर निवेदन देतेप्रसंगी प्रा.नानासाहेब लिगाडे, इंजि.रमेश जाधव, गिरीष गंगथडे, अॅड.नितीन गव्हाणे नंदकुमार शिंदे, समाधान पाटील, वैभव केदार, गिरीष गंगथडे, विनायक कुलकर्णी, बाळासाहेब शिंदे, आकाश व्हटे, दिपक गोडसे यांच्यासह शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.