सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

निसर्गाने जरी कृपा केली नसली तरी सरकारने कृपा दाखवावी- डॉ.बाबासाहेब देशमुख

सांगोला(प्रतिनिधी):-  निसर्गाने मारले तर मायबाप सरकारने तारले पाहिजे, निसर्ग हा लहरी बनलेला असताना सरकारने जबाबदारी घेऊन शेतकरी कष्टकरी यांना आपले संसार अडचणीतुन बाहेर काढण्यासाठी उपाय योजना आखून त्यांची अंमलबजावणी केली पाहिजे. निसर्गाने जरी कृपा केली नसली तरी सरकारने कृपा दाखवावी व लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे.

आज मितीला शेतकर्‍यांच्या विहिरीतील पाणी पातळी कमी झालेले आहे.. शेतीच्या पाण्याची आडचण निर्माण झाली आहे पुढच्या महिनाभरात शेतीच्या पाण्याच तर सोडाच माणसांना व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची आडचण निर्माण होणार आहे तसेच जनावरांच्या चार्‍याचा ही अडचण निर्माण होणार आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत आला तर कष्टकरी,कामगार अडचणीत येतो ..लहान मोठे व्यवसायीक अडचणीत येतात त्यामुळे राज्य सरकारने आशा कठीण परिस्थितीत ताबडतोब उपाय योजना केल्या पाहिजेत. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना हेक्टरी भागाताला पन्नास हजार व जिरायतीला पंचवीस हजार रुपयांची आर्थिक साहाय्य करावे…तसेच पिक विम्याची रक्कम ताबडतोब मिळावी..अजुनही काही शेतकर्‍यांना पिक विमा मिळत नाही व काहींचे हफ्ते थकीत आहेत याचाही विचार सरकारने गांभीर्याने करावा. रेशन दुकानात मिळणाऱे अत्यावश्यक सामान हे योग्य पध्दतीने व महिन्याच्या शेवटापर्यंत वितरीत करावे.तसेच शेतकर्‍यांच्या विज बिलामध्ये सवलत देण्यात यावी अशा उपाययोजना ताबडतोब करुन सरकारने सामांन्यांना धीर द्यायला हवा.

राज्य सरकारने राज्यातील बहुतांश तालुक्यात जाहीर केला आहे… दुष्काळ जाहीर केला परंतु त्या वरच्या उपाययोजना काय करायच्या आहेत ..यांचे अजुनतरी नियोजन पहावयास मिळत नाही.. दुष्काळ जाहीर केला आहे तर मग दुधाचे कमी झालेले दर ताबडतोब वाढवून काही अंशी शेतकरी व पशुपालकांना मदत करावी..दुधाचे कमी होणारे दर यावरती सरकारचा अंकुश असायला हवा.. परंतु राज्य सरकार ठोस निर्णय घेताना दिसत नाही काही दिवसांपूर्वी दुध दराबाबत एक समिती गठीत केली त्याचा अहवाल गुलदस्त्यात आहे..समितीने काय ठरवले ते माहीत नाही त्यामुळे दुधाचे दर कमी झाले तरी राज्य सरकार मुग गिळुन का गप्प आहे असा सवाल उपस्थित होत आहे.

राज्य सरकारने आशा उपाययोजनांची सुरवात  दुधाला चांगला दर देऊन केली पाहिजे..या अगोदरही दुधाचे दर मनमानी पद्धतीने कमी केले होते त्यावेळेस राज्य भर अनेक संघटनांनी आंदोलने केली होती ..शेतकरी कामगार पक्षानेही दुध दर वाढीसाठी आंदोलन केले होते त्यांचा परिणाम सरकारने दुध दर वाढ करण्याचे निर्देश होतें .. परंतु पुन्हा दुधाचे दर कमी झाल्याने शेतकरी कामगार पक्ष पुंन्हा दुध दरवाढीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले असल्याची माहिती प्रसिध्दप्रमुख चंद्रकांत सरतापे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!