सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

माझी मुले, पत्नी, कुटुंब सध्या टेन्शन मध्येे….म्हणून मी माझ्या पत्नीला सांगणार आहे.

सांगोला येथे आ.रोहितदादा पवार यांनी साधला विरोधकांवर निशाणा

सागोंला(प्रतिनिधी):-कष्टातून उभ्या केलेल्या माझ्या व्यवसायाला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे सध्या माझी मुले टेन्शनमध्ये आहेत, माझी पत्नी टेन्शनमध्ये आहे, कुटुंब टेन्शन मध्ये आहे. माझे आई वडिल टेन्शनमध्ये आहेत. पवार कुटुंब फक्त पवार आडनावाचे नाही. पवार कुटुंबामध्ये महाराष्ट्राची सर्वसामान्य जनता आहे. जनता जर आपल्या बरोबर असेल तर काही घाबरायची गरज नाही असे मी माझ्या पत्नीला सांगणार आहे. उद्या जर माझ्या सारख्या कार्यकर्त्याला जेलमध्ये टाकले तरी चालले. पण स्वाभिमानासाठी आता आपल्या सर्वांना लढायचे आहे. हा लढा पुढे घेऊन जायचे आहे. या स्वाभिमानी राज्यामाध्ये आपल्या विचाराचे सरकार आणायचे आहे. त्यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहे. नुसते लढायचे फक्त लढण्यासाठी नाही तर आता जिंकण्यासाठी लढायचे असे सांगत महाराष्ट्रातील लोक दिल्लीपुढे कधीही झुकली नाही असे मत आ.रोहितदादा पवार यांनी व्यक्त केले.

शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना व महाविकास आघाडी यांच्या वतीने सांगोला येथे सोमवार दि.11 मार्च रोजी भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला. या मेळाव्या प्रसंगी आमदार रोहितदादा पवार बोलत होते. व्यासपीठावर श्रीमती रतनबाई गणपतराव देशमुख, शेकाप सरचिटणीस भाई जयंत पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, राजू कोरडे, डॉ.बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख, पंढरपूरचे अभिजीतआबा पाटील, राष्ट्रवादीचे बाबुराव गायकवाड, भरत अण्णा शेळके,चिटणीस दादाशेठ बाबर, डॉ.प्रभाकर माळी, मारुतीआबा बनकर, बाळासाहेब एरंडे, सूर्यकांत घाडगे, अरविंद पाटील, नवनाथ पाटील,काँग्रेसचे अभिषेक कांबळे, तोहीद मुल्ला यांच्यासह मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.रोेहितदादा पवार म्हणाले, महाराष्ट्रात सध्या एक महाशक्ती भावा-भावामध्ये, कुटुंबांमध्ये, पार्टीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारला फक्त सत्ता पाहिजे. हेच आमच्यातील काही लोकांना कळत नाही. पवार साहेबांना जनतेने प्रेम दिले आहे. भाजपाला प्रेम काय करणार आहे. हे मंत्री पद द्या ते मंत्री द्या यासाठी दिल्लीच्या किती वार्‍या केल्या.? खासदारकीला आमच्या जवळच्या लोकांना 9 देतील असे वाटत होते. पण 3 च मिळतील, असा टोलाही लगाविला.
भाजपला कुणाचेही घेणे देणे पडले नसून फक्त स्वतःचे हित पडले आहे.येणार्‍या लोकसभा निवडणुकीत दबावतंत्र वापरण्यात येणार आहे. यासाठी आपणा सर्वांना एकजुटीने लढावयाचे आहे. सरकारकडून फक्त जाहिरातींवर खर्च करण्यात येत असून फुटून गेलेले आमदार उद्या आमदार नसणार आहेत.येणार्‍या सर्व निवडणुकामध्ये स्वाभिमानी महाराष्ट्र राज्यांमध्ये आपल्या विचाराचे सरकार आणा असेही आवाहन सुध्दा शेवटी त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!