पाणी सोडण्याच्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा; पुणे येथील बैठकीत डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांची मागणी
सांगोला(प्रतिनिधी):-निरा उजवा कालव्याचे पाणी वेळेआधीच बंद केल्याने व जे पाणी दिले ते ही पुर्ण क्षमतेने दिले नसल्याने शेतकर्यांची पिके जळुन गेली आहेत. सध्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय निर्माण झाली आहे तसेच निरा उजवा कालव्याला पाणी नसल्याने अनेक गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद अवस्थेत आल्या आहेत.यावेळी पाणी सोडण्याच्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी निवेदनाद्वारे कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे प्रमुख खपोले यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी दिली.
काल पुणे येथील सिंचन कार्यालयात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी आ.दिपक चव्हाण, धैर्यशील मोहिते पाटील, उत्तमराव जानकर, शहाजीराजे देशमुख, मा.दत्ताभाऊ टापरे यांच्या सह सर्वच तालुक्यातील नेते मंडळी व लाभधारक तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
सदर बैठकीदरम्यान डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी खपोले यांना पाणी सोडण्याचा जो कायदा आहे त्या कायद्याची आठवण करून दिली. पाणी हे टेल टु हेड सोडण्याचा कायदाच आहे परंतु तसे होत नाही तसेच जे पाणी आपण सोडता ते पाणी पुर्ण क्षमतेने सोडत नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे सध्या अनेक तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश आहे.अशा तालुक्यात पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे सांगोला तालुक्यात तर पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावा लागले आहेत.विशेषतः जनावरांच्या चार्याची व जनावर्यांच्या पिण्याच्या पाण्याची भरपूर प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे.अशा बिकट अवस्थेत लवकरात लवकर पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घ्यावा असे आवाहन डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी केले असल्याची माहिती प्रसिद्ध प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.