sangola

डोंगर पाचेगाव पाझर तलावाचा मोबदला मिळाल्याशिवाय काम सुरू होऊ देणार नाही...?

HTML img Tag Simply Easy Learning    
शेतकऱ्यांचा जलसंधारण विभागाला इशारा अन्यथा उपोषण करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
कोळा (जगदीश कुलकर्णी ):-सांगोला तालुक्यातील डोंगर पाचेगाव येथील जलसंधारण विभागाच्या वतीने अनेक कोटी रुपये खर्चून गिड्डे मळा पाझर तलावाचे  काम सुरू असून या तलावामध्ये घोडके गिड्डे भोसले देवकुळे या शेतकरी वर्गाची जवळपास ३५ ते ४० एकर जमीन गेलेली आहे वारंवार शासनाकडे पाठपुरावा मागणी करून मोबदला मिळाला नाही शासन या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून या भागातील शेतकऱ्यांनी  जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाल्याशिवाय तलावाचे काम सुरू होऊ देणार नाही अन्यथा सांगोला तहसील कार्यालय उपोषण करणार असल्याचा इशारा माजी सैनिक हरिभाऊ घोडके व साहेबराव गिड्डे यांनी व शेतकऱ्यांनी दिला आहे.
पाचेगाव बुद्रुक भागात डोंगराच्या जवळ बानुरगड हद्दीजवळ गिडे तलावाचे जलसंधारण विभागाच्या वतीने काम मंजूर होऊन सुरू होणार असून या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यात गेलेले आहेत शासनाने अधिक ग्रहण केले आहे परंतु गेलेल्या जमिनीवर शेतकऱ्यांचा मालकी हक्क नावावर आजही आहे काही वर्षांपूर्वी अधिग्रहण झाल्याने शेतकऱ्यां तळ्यात काही करता येत नाही सगळ्या जमिनी तलावात गेलेले आहेत शासनाकडे पाठपुरावा करूनही गेलेला जमिनीचा शेतकऱ्यांना अजून मोबदला मिळाले नाही शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे वारंवार शासनाकडे मागणी करूनही शासन मोबदला द्यायला तयार नाही जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असून जलसंधारण विभागाकडून गिड्डे मळा तलावाचे काम पुनर्भरणाचे सुरू होणार आहे तसेच तळ्याजवळून गेलेल्या टेंभू योजनेच्या कॅनॉलचे काम झाले आहे राहिलेल्या जमिनी सुद्धा त्या कॅनॉलमध्ये गेल्यामुळे शेतकरी भूमीहिन झाला असून त्याचाही अजून मोबाईलला शेतकऱ्यांना मिळाला नाही याकडेही शासनाने लक्ष द्यावे  शेतकऱ्यांना गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळाल्याशिवाय शेतकरी वर्ग काम सुरू होऊ देणार नाही खणखणीत इशारा शेतकऱ्यांनी दिला.
सेवानिवृत्त माजी सैनिक साहेबराव गिड्डे म्हणाले जलसंधारणाच्या गड्डे तलावात गेलेल्या जमिनीचा मालकी हक्क आज तागायत आमच्याकडेच आहे एवढ्या वर्षाची नुकसान भरपाई आताच्या जमिनीची किंमत सरकारने दिलीच पाहिजे अन्यथा आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महिला शेतकरी सौ अलका अशोक भोसले म्हणाल्या माझी स्वतःची जमीन ५ एकर या तलावात केल्यामुळे भूमिहीन झालो   सर्वसामान्य माझे कुटुंब ऊस तोडीला ६ महिने जात असतो गावाकडे आल्यावर राहिलेले जमीन सुद्धा टेंभूच्या कॅनलला अधिग्रहण करून शासनाने घेतली आहे मोबदला मिळाल्याशिवाय काम सुरू करू नये असे सांगितले.
शेतकरी बाबासो नामदेव देवकुळे म्हणाले जमीन गेल्यामुळे मी रस्त्यावर आलो आहे वारंवार मागणी करू नये शासनाने मोबदला दिलाच नाही. शेतकरी विनायक घोडके म्हणाले बांधवांच्या भरावयामध्ये माझी जमीन गेली आहे खायचं काय असा प्रश्न पडला आहे दोन मुले बेरोजगार आहेत घर रस्त्यावर आला आहे.
रवी शिंदे म्हणाले जमिनीचा मोबदला मिळाल्याशिवाय काम सुरू करू देणार नाही. वेळ पडल्यास सांगोला तहसील कार्यालयाजवळ उपोषणाला बसणार आहे असे शेतकरी वर्गाने प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!